Wednesday 17 January 2024

अण्णा आणि जन आंदोलन ....

अण्णा आणि जन आंदोलन ....
१२ दिवसा नंतर अण्णाचे उपोषण संपले. खरंच अण्णा जिंकले का? या उपोषणाने सर्व गोष्टी साध्य केल्या का? या प्रश्नांची उत्तरे आता मिळतील का? 
इथे युके मध्ये बसून इंडिया मधील  परिस्थितीचा आढावा घेणे कठीण आहे पण  येथे बसून तटस्थ विचार मात्र करता आला. तो इंडिया मध्ये असताना करता आला नसता. अण्णा यांना विरोध म्हणजे सरकार आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा, असे सरळ दोन तट. 
जन लोकपाल बिलबद्दल बोलू. ज्या तीन मागण्या अण्णा लावून धरत आहेत त्या भविष्यामध्ये भारतीय लोकशाहीला मारक नाही आहेत का ? आपण फक्त भ्रष्टाचारचा  विचार करत आहोत का?
मान्य आहे या दोन वर्षात खूपच भ्रष्टाचार झाला, दोषी मंत्र्यांवर कारवाई पण झाली. पण ती पुरेशी नव्हती.  लोकांचा आवाज दाबला जात होता तो अण्णा च्या आंदोलना मुळे मोकळा झाला इतकेच. 
खरे सांगायचे झाले तर आपण भारतीय जनेतला देवदूत ची गरज नेहमीच भासते.. मग आपण तो चित्रपटातून किंवा खेळाच्या माध्यमातून देवदूत उभे करतो. मग तो चित्रपट रंग दे बसंती, लागे राहो मुना भाई यातून वक्ता होतो इतकेच.  खेळाच्या माध्यमातून सचिन ला उभे करतो. असो. 
सांगायचा मुद्दा हा असा कि या आंदोलनात सहभागी झालेल्यांनी ते जन लोकपाल बिल वाचले असेल का? उत्तर हे नाहीच असेल. आपण आंदोलनात सहभागी होतो आहोत, पण जनतेने कधी विचार केला आहे का आपण यालाच खतपाणी घालतो.. बरोबर आहे आपण situation ला शरण गेलो असतो कारण आपण system नाही बदलू शकत. आणि ती अशी नाही बदलणार जादू ची काडी फिरवल्या सारखी. 
पण आपण शपथ घेऊ शकतो कि आपण भ्रष्टाचार नाही करणार आणि होऊ ही नाही देणार जेव्हा प्रत्येक जण हा संकल्प सोडेल तेव्हा कुठे याचा पाया ठिसूळ होईल. 
हि लढाई इथे संपत नाही मित्र हो.. किंवा जन लोकपाल बिल हि याला संपवू शकेल. आपण भाबडा आशावाद सोडूया. 

No comments:

Post a Comment